भारत हा गुरूला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या अशा महान संस्कृतीचा देश आहे. आपल्या देशात Guru हा शब्द जरी ऐकला तरी वंदन करायचे मन होते इतकी गुरूची महिमा अपार आहे. याच पार्श्वभूमीवर 5 September 2026 रोजी शिक्षक दिवस (teachers day) असून या दिवसाचे महत्व, शिक्षक दिनाचा इतिहास, शिक्षक दिवस कसा साजरा केला जातो, तसेच या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना काय गिफ्ट देऊ शकता, शिक्षक दिवस संबंधी छान छान व्हॉट्सअँप शुभेच्छा मेसेज (teachers day wishes)आणि guru प्रती आदर दर्शविण्यासाठी विद्यार्थी शिक्षक या पवित्र नात्यावर नात्यावर बनविलेले बनलेले 5 प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शिक्षक दिवस (teachers day) दरवर्षी 5 September रोजीच का साजरा केला जातो?
मित्रांनो आपल्या देशात एक विद्वान गृहस्थ होऊन गेले. त्यांचे नाव आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रख्यात तत्त्ववेत्ते, आदर्श शिक्षक, प्रकांड पंडित असे सर्वगुणसंपन्न असलेले भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आलेले डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा 5 September रोजी झाला असल्यामुळे त्यांच्या महान कार्याला समर्पण म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतात हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या गौरवाने साजरा केला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी महत्वाचे
शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी त्याकाळी त्यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केले. इतकेच काय तर त्यांनी फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान) विषयात एम. ए. ची सन्मानाची पदवी सुद्धा संपादन केली. त्यांनी 1931 ते 1936 या कालावधीत तत्कालीन आंध्रा युनिव्हर्सिटी तसेच 1939 साली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चे व्हाइस चान्सलर पद भूषविले. सन 1917 आली त्यांनी (The Philosophy of Rabindranath Tagore) रवींद्रनाथ टागोरांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक प्रकाशित केले .
प्रखर बुद्धिमत्ता आणि साधेपणा होती त्यांची ओळख
आज आपण ज्या हर्ष उल्हासाने डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस (teachers day) म्हणून साजरा करतो ते विद्येचे धनी लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले तेव्हा ते सर्वच विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षक बनले.
शिक्षक दिवस (teachers day) साजरा करण्यामागचा इतिहास
1962 साली जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करायचे ठरवले. 5 September हा त्यांचा वाढदिवस. हाच दिवस सत्काराचा ठरला. त्यांची शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बघता 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता तसेच त्यांच्या पावन स्मृतीस उजाळा देण्यासाठी संपूर्ण देशात 5 September या दिवशी मोठ्या उत्साहाने देशाच्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक दिवस (teachers day) साजरा केला जातो.
यंदा १०९ शिक्षकांना मिळणार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
Teachersday teachers
पंडित नेहरूंनी काढले होते गौरवोद्गार
स्वतंत्र भारताचे पहिले उप राष्ट्रपतिपद भूषविणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी बोलताना एकदा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, “डॉ. राधाकृष्णन यांनी खूप क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक आदर्श शिक्षक असून आपण सर्व त्यांच्यापासून खूप काही शिकलो आहेत अन् भविष्यात सुद्धा शिकत राहू.” अशाप्रकारचे गौरवोद्गार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या तोंडून डॉ. राधाकृष्णन यांच्याविषयी निघाले होते. अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करूनसुद्धा डॉ. राधाकृष्णन स्वतःला मात्र नेहमी एक शिक्षक म्हणायचे. इतका साधेपणा या महान पुरुषाच्या अंगी होता.
शिक्षकांचे समाजातील महत्व
आजचा हा शिक्षक दिवस (teachers day) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास असतो. कुंभार जसा मातीच्या घड्याला हवा तसा आकार देऊन त्याच रुप सुरेख करतो, त्याचप्रमाणे शिक्षक मुलांच्या आयुष्यात शिस्त लावून त्यांच्या नाजूक मनाला हवा तसा संस्कृतीचा, मूल्यांचा आकार देऊन एक उत्कृष्ट नागरिक देशाला देत असतात. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राशन करणारा व्यक्ती गुरगुरल्या शिवाय राहत नाही.” बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सुविचार मध्ये शिक्षणाचं अपार महत्व सांगितल आहे. आणि हेच शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यात स्वाभिमानाने जीवन जगायचं कौशल्य अन् सामर्थ्य निर्माण करण्याचं महान कार्य शिक्षक करत असतात.
शिक्षकांची महिमा अपरंपार

चांगला समाज अन् चांगले नागरिक घडविण्यामागे शिक्षकांचे योगदान वाखणाण्याजोगे असते. आई वडील आपले प्रथम गुरू असतात. आयुष्यात शालेय शिक्षकांव्यतिरिक्त असे अनेक जण आपापल्या भेटतात अन् काहीतरी नवीन शिकवून जातात. आयुष्याची खडतर लढाई लढत असताना अनेकांचे मार्गदर्शन आपल्याला जीवन जगत असताना होत असते. अशा सर्वच ज्ञात अज्ञात शिक्षकांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा 5 September हा शिक्षक दिवस (teachers day) आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा असून या दिनाची महती शब्दांत सांगणे अवघड आहे. सर्वच शिक्षकांच्या चरणी नमन करून त्यांच्याबद्दल प्रेम दाखवून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता दाखवून त्यांना या दिवशी समर्पण द्यायचे असते. तसेच त्यांच्या या भरीव सामाजिक कार्यासाठी त्यांचे आभार मानायचे असतात.
शिक्षक दिवस (teachers day) असा केला जातो साजरा
देशातील प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये 5 September रोजी शिक्षक दिवस साजरा केल्या जातो. या दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनीच शिक्षक बनून इतर विद्यार्थांना शिकवत असतात. आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवता यावे यासाठी महिनाभर आधीपासूनच शिकविण्याचा सराव अन् अभ्यास करत असतात. हा दिवस सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप मौजमजेचा असतो. कारण एरवी अध्ययनाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या खास दिवशी अध्यापन करण्याची संधी मिळते.
तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांना एक दिवसापुरते का होईना, पण नवीन शिक्षक मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांचे सार्वजनिक संभाषण कौशल्य निखरण्यास मदत होते. तसेच त्यांच्यात वकृत्वकलेचा आत्मविश्वास निर्माण होण्यास मोलाचा हातभार लागतो. सर्व तासिका पूर्ण झाल्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांना सार्वजनिक श्रद्धांजली देण्यात येते. आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्व आणि भरीव कामगीरी विषयी भाषणे देतात.
या 5 प्रकारे द्या तुमच्या शिक्षकांना या शिक्षक दिनी खास गिफ्ट/ teachers day gifts
1) तुम्ही जर कुकिंग विषयी जाणकार असाल तर तुमच्या शिक्षकांसाठी एखादा छान केक बनवून त्यांना या शिक्षक दिनी (teachers day) आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकता.
2) तुमच्या शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर दर्शविण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी कोलाज चित्रे तयार करू शकता. तुमचा ग्रुप तयार करून चित्रांचा संग्रह बनवा. तुम्ही स्वतः बनविलेल्या विविध चित्रावर त्यांच्यासाठी सहृदय संदेश लिहून त्यांच्या कार्याचा सन्मान करून तुमची आत्मीयता दाखवू शकता.
3) आपल्या प्रिय शिक्षकांना 5 September या पवित्र शिक्षक दिवशी ( teachers day) आपण thank you कार्ड सुद्धा देऊन त्यांच्याप्रती तुमची कृतज्ञता व्यक्त करू शकता. आभार कार्डवर मस्तपैकी छान छान मेसेज लिहून त्यांना तुम्ही तुमच्या मनातील त्यांच्याविषयी असलेल्या आदराने भारावून टाकू शकता
4) तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांची आवड माहीत असेल तर त्यांना त्यांच्या आवडीचे एखादे छोटेसे गिफ्ट देऊन खुश करू शकता. बरेच विद्यार्थी शिक्षक दिनी (teachers day) अशाप्रकारे सुंदर गिफ्ट देऊन शिक्षकांना अनदित करत असतात.
5) तुम्ही जर पर्यावरण प्रेमी असाल तर तुमच्या शिक्षकांना गिफ्ट देण्यासाठी त्यांच्या नावाने तुमच्या शाळेतील आवारात एखादे झाड लावू शकता. हे आपल्या शिक्षकांना आनंदी करण्यासाठी एक नवीन पण प्रभावी माध्यम असू शकते. कारण जेव्हा जेव्हा तुमचे शिक्षक तुम्ही लावलेल्या झाडाकडे बघतील तेव्हा त्यांना तुमचे त्यांच्याप्रती असलेले प्रेम अन् आदर याची त्यांना जाणीव होत राहील
ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे 1 लाखाची शिष्यवृत्ती, असा करा अर्ज
शिक्षक दिवस( teachers day) साठी व्हॉट्सॲप शुभेच्छा शुभेच्छा/ teachers day wishes/teachers day whatsapp messages
1) “तुमच्यासारखा शिक्षक मिळणे आशीर्वादापेक्षा कमी नाही.” शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सर
2) “गुरु विना ना मिळे ज्ञान
ज्ञानाविना ना होऊ सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदुया गुरुराया”
3) “आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रिय शिक्षकांना शतशः नमन”
4) “शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
तत्वातून मूल्य फुलविणारा,
शिक्षक म्हणजे अखंड झरा
अखंड वाहत राहणारा”
5) “दिले ज्ञानाचे आम्हाला भंडार
केले आम्हाला भविष्यासाठी तय्यार,
सदैव ऋणी असू त्या गुरूंचे
ज्यांनी दिला आमच्या आयुष्याला आकार”
6) “आई गुरू आहे, वडीलही गुरू आहेत. आयुष्यात ज्यांनी आपल्याला काही शिकवलं ते सगळेच आपले गुरू आहेत.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
7) “उत्तम शिक्षक तुम्हाला आयते उत्तर देत नाहीत, तर ते तुम्हाला उत्तर शोधण्याचे कौशल्य निर्माण करून देतात.”
happy teacher’s day
8) “अज्ञानाचा अहंकार दूर सारून आमचे जीवन ज्ञानरूपी प्रकाशने उज्ज्वल करून टाकणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा”
9) “जर सूर्याची किरणे उगवली नसती,
तर आकाशाचा रंगच दिसला नसता
जर सावित्रीबाई फुले जन्मल्या नसत्या,
तर स्त्रिया आज चूल अन् मुल यातच अडकून पडल्या असत्या.”
happy teacher’s day
10) “आदरणीय सर, आपण माझ्या आयुष्याला जो संस्कार आणि ज्ञानाचा आकार दिला, त्यामुळेच मी आज अभिमानाने जीवन जगण्याचा आनंद घेत आहे.” शिक्षक दिनाच्या सहृदय शुभेच्छा सर
शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे अन्य महापुरुष
1) राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य अफाट होते. त्यांच्या काळात वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय करत असत. महात्मा जोतीबा फुले आणि त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई यांनी उच्च वर्णीय समाजाचा तीव्र विरोध आणि त्रास सहन करून दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी पार पडली. शाहू महाराजांनी सन १९१७ मध्ये कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला.
हा कायदा करताना महाराजांनी पालकांसाठी दंड सुद्धा ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रुपया इतका त्याकाळच्या मनाने जास्त दंड ठेवला. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचा पाया भक्कम केला. माणसाची शैक्षणिक प्रगती झाली तरच आर्थिक आणि सामाजिक उन्नती होऊ शकेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे शाहू महाराज म्हणायचे. शिक्षण घेताना तत्कालीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन महाराजांनी त्यावर प्रभावीपणे उपाययोजना आखल्या.
आर्थिदृष्ट्या मागासलेले तसेच गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्यांच्या संस्थानात अनेक वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल अन् कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेजमध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे खडतर शासन करून त्या अनुचित प्रकाराला आळा घातला. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम जारी केला. संस्थानातील ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची आर्थिक सहाय्य तसेच इतर सवलती बंद करण्याचे सक्त आदेश काढले.
2) स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया रचण्यासाठी कोणत्या महापुरुषाचे सर्वात जास्त योगदान असेल तर ते आहे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील कर्मठ पुराणमतवाद्यांचा अन् सवर्णांच्या प्रखर विरोधाला अजिबात न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केल्या आणि खऱ्या अर्थाने भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील हे भरीव कार्य शतशः नमन करण्यासारखे आहे.
महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 शाळामध्ये सुरु केली. मुलींच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेतले. सर्वप्रथम त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षित केले अन् शिक्षित समाजाची सुरुवात स्वत:पासून केली. माणसाने पक्का निर्धार केला तर समाजात अमुलाग्र बदल घडवता येतो हे महात्मा फुले यांच्या उदाहरणावरून आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखे आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी स्वखर्चाने अनेक शाळा चालवल्या.
सावित्रीबाई फुले यांच्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तत्कालीन स्त्री शिक्षणाचं कार्य जोमात सुरू होऊन स्त्रियांना आपले अधिकार कळून बंधनापासून मुक्त होता आले यात शंका नाही. शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या दुःखमुक्तीचा आणि शोषणमुक्तीचा ध्यास जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घेऊन तो पूर्णत्वास नेल्यामुळेच आज स्त्रिया पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून कठीनातील कठीण कार्य मोठ्या कर्तबगारीने करताना दिसून येतात. देशातील करोडो स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही.
3) परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ हा उद्धाराचा राजमार्गच बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयांना दिला. त्यांचे गुरू महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विषमतानिर्मूलनाच्या कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे यशस्वीरीत्या चालविला अन् ज्योतीबा फुले यांचे सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविण्याचे काम केले. स्वतः शोषित असल्यामुळे जीवनभर भोगलेला प्रचंड त्रास आणि अपमान यांची जाणीव असलेले एकमेव महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर. समाजाच्या तळागाळातील शोषित लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह होता. देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे त्या समाजाला शिक्षित करणे हा आहे, असे त्यांचे मत होते.
प्रचंड बुद्धिमत्ता असलेले, प्रचंड विपरीत परिस्थितीत जिद्दीने देश विदेशात शिकून 32 पदव्या संपन्न केलेले महापुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास एक कादंबरीचं लिहावी लागेल. त्यांच्या काही शैक्षणिक कार्याची माहिती संक्षिप्त स्वरूपात देता येईल.
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना
तत्कालीन कनिष्ठ जातीतील समाज बांधवांत शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा तसेच त्यांची सामाजिक-आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत हितकारिणी संघटनेची’ स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे जानेवारी ४, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासह शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. डॉ. आंबेडकरांनी सदर हॉस्टेलला सोलापूर नगर पालिकेकडून चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. नंतर या अनुदानाच्या साहाय्याने या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक काढले. याशिवाय एक मोफत लायब्ररीसुद्धा कार्यान्वित केली.
दलित शिक्षणसंस्थेची स्थापना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ जून १९२८ साली दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस सहाय्य करावे असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांनी आर्थिक मदत त्यांना देऊ केली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
अस्पृश्य लोकांपासून ते निम्न मध्यमवर्गातील लोकांना उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ साली मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय स्थापन केले
शिक्षक दिवस(teachers day) निमित्त शिक्षकांचे महत्व पटवून देणारे 5 प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट
1) चक दे इंडिया
शाह रुख खान या अभिनेत्याने रेखाटलेल्या हॉकी शिक्षकाची अप्रतिम अभिनयाची झलक या चित्रपटातून दिसून येते. खेड्यापाड्यातील मुलींना शिस्त लावून त्यांच्याकडून कठोर मेहनत करून घेऊन भारताला महिला हॉकी विश्वचषक प्राप्त करून देण्याची प्रेरणादायी कथानक असलेला हा उत्कृष्ट चित्रपट सर्व शिक्षक आणि विद्यार्थांनी एकदा तरी पहावा. यातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.
2) सुपर थर्टी
हृतिक रोशन अभिनित या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली होती. हृतिक रोशन ने यात स्पर्धा परीक्षा शिक्षकाची भूमिका बजावली होती. बिहारमधील एका शिक्षकाच्या सत्य कथेवर आधारित हा चित्रपट असून या शिक्षकाचे नाव प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्यावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला आहे. आयआयटी जेईई सारख्या महागड्या स्पर्धा परीक्षेसाठी फी भरू न शकणाऱ्या झोपडपट्टीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेऊन त्यांचे जीवन घडविण्याचे कथानक आपल्याला या चित्रपटात दिसून येईल. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींनी आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे.
3) तारे जमीन पर
बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता आमिर खानचा हा चित्रपट आहे. एका मतिमंद विद्यार्थ्यांला शिक्षकच काय तर आई बाबा सुद्द्धा कंटाळलेले असताना त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण बाहेर आणून त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास मिळवून देण्याचे प्रेरणादायी कथानक या चित्रपटात आहे. मी स्वतः कॉलेजमध्ये असताना हा चित्रपट 10 रिलिज झाला तेव्हा पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे तरी मला कंटाळा आला नाही. इतकी खुर्चीला खिळून ठेवणारी या चित्रपटाची स्टोरी आहे. शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेली सुमधुर गाणी ऐकून वातावरण अगदी झक्कास होते.
4) लक्ष्य
या चित्रपटात सुद्धा तुम्हाला हृतिक रोशन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसेल. एक बेपर्वा तरुण या चित्रपटात कशा पद्धतीने आपल्या करिअर प्रती गंभीर होऊन लष्करात मोठ्या पदावर स्थानापन्न होतो हे तुम्हाला या चित्रपटातून जाणवेल. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका सामान्य बेफिकीर तरुणाचे भविष्य घडून आणले आहे. लष्कर किंवा पोलिस होणे हे ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे अशा विद्यार्थांनी हा चित्रपट जरूर पहावा.
5) हिचकी
राणी मुखर्जी या चित्रपटात एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसून येईल. या चित्रपटात या नैना माथूर ची भूमिका केलेल्या हा शिक्षिकेला एक विचित्र आजार असतो. या आजारावर मात करत ती कशाप्रकारे तिच्या विद्यार्थ्यांचे जीवन घडवते, आणि जीवनाच्या या खडतर प्रवासात तिला तिचे विद्यार्थी कशाप्रकारे सपोर्ट करतातयाविषयी कथानक फिरते. शेवटी ती सर्व चॅलेंजेसवर मात करून कशाप्रकारे तिच्या या आजारावर मात करते याविषयी हा चित्रपट आहे.
शिक्षक दिनाचे भाषण(teachers day speech) : माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी
(सुरूवात सर्वांना उद्देशून) सन्माननीय मुख्य अतिथी, आमचे प्रिय प्राचार्य महोदय/महोदया, आदरणीय शिक्षकगण, माझ्या सहकारी विद्यार्थ्यांनो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व पालक यांच्या समोर मी हे भाषण करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण शिक्षक दिन साजरे करत आहोत. हा दिवस केवळ एक उत्सव साजरा करण्याचा नसून, तर आमच्या आयुष्याला आकार देणाऱ्या, आमच्या मार्गदर्शक, आमच्या हीरो – म्हणजेच आपल्या सर्व शिक्षकांना आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. (शिक्षकांच्या योगदानाबद्दल) एखाद्या शिक्षकाचे काम फक्त पाठ्यपुस्तकातील सूत्रे आणि तथ्ये शिकवणे इतकेच सीमित नसते. तर ते एका अग्निपरीक्षेच्या वेळी आधार बनणे, एखाद्या चुकीतून शिक्षण देणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत्म्यातील विशेष गुण ओळखून त्याला घडवणे हे आहे. आपण आम्हाला फक्त गणित, विज्ञान आणि इतिषाच शिकवत नाही, तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारे सहनशीलता, शिस्त, ईमानदारी आणि चांगले संस्कार शिकवता. आपण केलेली कष्ट आणि त्याग हे केवळ वर्गातच दिसत नाही, तर ते आपण रात्री उशिरा तयारी करताना, आमच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना, आणि आमच्या प्रत्येक लहान मोठ्या यशासाठी आनंदी होताना दिसते. (वैयक्तिक स्पर्श आणि आभार) मला आठवते, जेव्हा मी [येथे एक छोटी व्यक्तिगत कहाणी किंवा उदाहरण घाला. उदा.: परीक्षेच्या वेळी खूप घाबरलो होतो, किंवा एखादा विषय समजत नव्हता, किंवा एखाद्या स्पर्धेत मार्गदर्शन केले], तेव्हा [शिक्षकांचे नाव किंवा सामान्यपणे] सर/मॅडम यांनी माझी कशी प्रोत्साहन देऊन मदत केली. त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळेच मी आज इथे उभा/उभी आहे. ही एक छोटीशी उदाहरणे आहे, पण अशा असंख्य क्षणांसाठी आम्ही आपले आभारी आहोत. (शेवट) तर, एका विद्यार्थ्याच्या वतीने, सर्व आदरणीय शिक्षकांना मी एकच सांगू इच्छितो: धन्यवाद. आमचे ज्ञानाचे दिव्य प्रज्वलित करण्यासाठी आपण स्वत:चा जीवन व्यय केला. आपण आम्हाला दिलेले ज्ञान आणि संस्कार हेच आमचे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि ते आम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे. आपण सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय विद्या! — भाषण देण्याची टिप्स: 1. व्यक्तिगत करा: [] मध्ये दिलेले भाग आपल्या वास्तविक अनुभवांनी बदला. हे भाषणास अधिक हृद्यस्पर्शी बनवेल. 2. सराव करा: भाषण अनेक वेळा मोठ्याने वाचून पहा. यामुळे आत्मविश्वास येईल. 3. संपर्क साधा: भाषण देताना शिक्षकांकडे पहा आणि सर्वांशी डोळ्यात डोळा भिडवून बोला. 4. प्रामाणिक राहा: आपले भाव प्रामाणिकपणे व्यक्त करा. हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आपले भाषण छान जाईल! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
——————————शिक्षक दिन सविस्तर भाषण, निबंध आणि सूत्रसंचालन मार्गदर्शिका २०२६
भाग १: आकर्षक सुविचार आणि चारोळ्या (लेखाच्या सुरुवातीसाठी)
(वाचकांना आकर्षित करण्यासाठी लेखाच्या सुरुवातीला हे सुविचार नक्की वापरा)* “गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान…” * “अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षक, मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देणारा शिल्पकार म्हणजे शिक्षक!” * “देवाला मानतो कारण तो जीवन देतो, पण शिक्षकांना पुजतो कारण ते जगायला शिकवतात.” * “अक्षर अक्षर जोडून ज्यांनी ज्ञानाचा महासागर दिला, अशा माझ्या सर्व गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम.”——————————भाग २: मुख्य आणि सविस्तर भाषण (विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी)## व्यासपीठाची वंदना आणि प्रस्थावना
आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मुख्याध्यापक, ज्ञानरूपी पंढरीचे विठ्ठल असणारे माझे सर्व पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज ५ सप्टेंबर, म्हणजेच आपल्या सर्वांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या, आपल्याला अक्षरांची ओळख करून देणाऱ्या आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या आपल्या आराध्य दैवतांचा, म्हणजेच शिक्षकांचा गौरव करण्याचा पवित्र दिवस! सर्वात आधी येथे उपस्थित असणाऱ्या आणि या देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस आपण संपूर्ण भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून अतिशय उत्साहाने, आदराने आणि कृतज्ञतेने साजरा करतो. आजचा हा दिवस केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर तो आपल्या गुरुंप्रति, आपल्या शिक्षकांप्रति नतमस्तक होण्याचा, त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा एक अतिशय भावनिक दिवस आहे. —————————— ## डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन: आदर्श शिक्षकाचा प्रवास आज आपण जो शिक्षक दिन साजरा करत आहोत, त्यामागे एका महान व्यक्तीचा इतिहास दडलेला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्ववेत्ता, महान विचारवंत आणि जगामध्ये भारताची ज्ञानपताका फडकवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तामिळनाडूतील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला होता. डॉ. राधाकृष्णन हे अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले होते. ते जेव्हा भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि त्यानंतर राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या काही मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अतिशय विनम्रतेने डॉ. राधाकृष्णन म्हणाले होते, “माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्यापेक्षा, जर तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला गेला, तर मला त्याचा सर्वात जास्त आनंद आणि अभिमान वाटेल.” एका देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने शिक्षकी पेशाला दिलेला हा सन्मान अभूतपूर्व होता. तेव्हापासून म्हणजेच १९६२ पासून आजतागायत आपण हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करत आहोत. —————————— ## शिक्षकांचे मानवी जीवनातील आणि समाजातील स्थान मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात तीन गुरु सर्वात महत्त्वाचे असतात. आपली पहिली गुरु ही आपली ‘आई’ असते, जी आपल्याला जन्माला घालते, बोलायला शिकवते आणि जगाची ओळख करून देते. आपले दुसरे गुरु हे आपले ‘वडील’ असतात, जे आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात आणि संकटांशी लढण्याचे बळ देतात. पण आपले तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे गुरु हे ‘शिक्षक’ असतात, जे आपल्याला समाजात कसे वागावे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचे ज्ञान देतात. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे वाचून दाखवणारी व्यक्ती नव्हे. शिक्षक हा समाजाचा पाया असतो. एक अभियंता पूल बांधतो, एक डॉक्टर रुग्णावर उपचार करतो, एक वैज्ञानिक रॉकेट बनवतो, पण या सर्वांना आधी माणूस म्हणून घडवण्याचे आणि त्यांच्यात कौशल्याची बीजे रोवण्याचे काम एक शिक्षकच करत असतो. म्हणूनच शिक्षक हा खऱ्या अर्थाने ‘राष्ट्रनिर्माता’ असतो. संत कबीर यांनी गुरूचे स्थान देवापेक्षाही मोठे मानले आहे. ते एका दोह्यात म्हणतात:“गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागूं पाय। बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय॥”जेव्हा गुरु आणि देव दोन्ही एकत्र उभे असतील, तेव्हा आधी गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावे, कारण देवाची ओळख सुद्धा आपल्याला गुरूनेच करून दिलेली असते. —————————— ## शिल्पकार आणि कुंभार: शिक्षकांची रूपके शिक्षकांची तुलना अनेकदा कुंभाराशी केली जाते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या कच्च्या गोळ्याला आतून हाताचा आधार देतो आणि बाहेरून हलकीशी थापट मारून त्यापासून एक सुंदर, सुबक घट तयार करतो; अगदी त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून, त्यांच्यावर संस्कारांचे घाव घालून त्यांना एक परिपक्व नागरिक बनवतात. आजच्या आधुनिक युगात इंटरनेट आणि गुगलवर सर्व माहिती उपलब्ध आहे. आपण एका क्लिकवर जगभरातील ज्ञान मिळवू शकतो. पण गुगल आपल्याला माहिती देऊ शकतो, ज्ञान आणि संस्कार नाही! कोणती माहिती कुठे आणि कशी वापरायची, संकटाच्या वेळी कसे खंबीर राहायचे, अपयशातून कसे शिकायचे, हे जगातील कोणतेही कॉम्प्युटर शिकवू शकत नाही; ते फक्त आणि फक्त आपले शिक्षकच शिकवू शकतात. —————————— ## गुरु-शिष्यांची भारतीय परंपरा आपल्या भारताला गुरु-शिष्यांची खूप मोठी आणि समृद्ध परंपरा लाभलेली आहे.* सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्णाने शिक्षण घेतले. * गुरू द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने धनुर्विद्येत नैपुण्य मिळवले. * राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबांवर केलेले संस्कार आणि दादोजी कोंडदेवांनी दिलेले शिक्षण यातूनच स्वराज्य स्थापन झाले. * चाणक्यांनी चंद्रगुप्तासारखा सामान्य मुलगा निवडून त्याला भारताचा सम्राट बनवले. * समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले.या सर्व उदाहरणांवरून हेच सिद्ध होते की, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर क्रांती झाली आहे, इतिहास घडला आहे, त्या प्रत्येक इतिहासाच्या मागे एका गुरूचा अदृश्य हात राहिला आहे. —————————— ## आजच्या विद्यार्थ्यांची कर्तव्ये आजच्या या शुभ दिनी आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपले शिक्षक आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. आपला अभ्यास पूर्ण व्हावा, आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, यासाठी ते स्वतःचा विचार न करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अशा वेळी शिक्षकांचा खरा सन्मान कशात आहे? तर शिक्षकांचा खरा सन्मान त्यांना महागड्या वस्तू किंवा भेटवस्तू देण्यात नाही, तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे आचरण करण्यात आहे. आपण एक आदर्श विद्यार्थी बनणे, समाजाचे भले करणे आणि आपल्या शिक्षकांचे नाव अभिमानाने उज्ज्वल करणे, हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरेल. —————————— ## कृतज्ञता आणि समारोप आज या व्यासपीठावरून मला प्राथमिक शाळेपासून ते आजपर्यंत शिकवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांची आठवण येत आहे. कधी अभ्यासासाठी दिलेला ओरडा, कधी वेळेवर न आल्यामुळे मिळालेली शिक्षा, तर कधी चांगले काम केल्यावर पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप… या सर्व गोष्टींनीच आज आम्हांला या लायकीचे बनवले आहे की आम्ही चार लोकांसमोर उभे राहून बोलू शकत आहोत. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना मला म्हणावेसे वाटते:अंधाराकडून प्रकाशाकडे नेले तुम्ही, जगणे काय असते हे शिकवले तुम्ही… जेव्हा जेव्हा आम्ही डगमगलो आमचा हात धरला तुम्ही, आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ तुमच्यामुळेच आहोत गुरुवर्य!मी माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो की तुमचे आशीर्वाद आणि तुमचे प्रेम आम्हा विद्यार्थ्यांवर आयुष्यभर असेच राहू दे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मुख्याध्यापकांचे आणि संयोजकांचे आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र! भारत माता की जय! ——————————शिक्षक दिनासाठी लहान व सोपी भाषणे (Short Speeches)हा2> पर्याय १: प्राथमिक शाळेतील मुलांसाठी छोटे भाषण (वय गट: ६ ते १० वर्षे)
बालमित्रांनो आणि आदरणीय गुरुजन वर्ग,
आज ५ सप्टेंबर, आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करत आहोत. आपल्या देशाचे महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या आठवणीत आपण हा दिवस साजरा करतो.
शिक्षक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. ते आपल्याला लिहायला, वाचायला आणि चांगले वागायला शिकवतात. आई-वडील आपल्याला घरी सांभाळतात, पण शाळेत शिक्षक आपल्यावर आईसारखंच प्रेम करतात. कधी कधी अभ्यास केला नाही तर शिक्षक रागवतात, पण तो रागावण्यामागे सुद्धा आपले भले व्हावे हाच विचार असतो.
मी आज सर्व शिक्षकांना प्रॉमिस करतो की आम्ही रोज अभ्यास करू आणि तुमचे नाव मोठे करू. माझ्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
धन्यवाद!
——————————पर्याय २: माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भाषण (वय गट: ११ ते १५ वर्षे)
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या शिक्षक मित्रांनो,
आजच्या या मंगल दिनी मी येथे शिक्षकांच्या महत्त्वावर बोलण्यासाठी उभा आहे. आपल्या संस्कृतीत ‘आचार्य देवो भव’ म्हटले गेले आहे, म्हणजेच शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे.
एक काळ असा असतो जेव्हा लहान मूल शाळेत येते, त्याला काहीही माहित नसते. कोरड्या पाटीसारखे त्याचे मन असते. त्या पाटीवर ज्ञानाची अक्षरे कोरण्याचे काम आपले शिक्षक करतात. गणिताची कठीण सूत्रे असोत, विज्ञानाचे प्रयोग असोत किंवा इतिहासातील पराक्रमाच्या गोष्टी असोत, शिक्षक प्रत्येक विषय आपल्याला सोपा करून शिकवतात.
शिक्षक फक्त परीक्षा पास होण्यासाठी शिकवत नाहीत, तर ते आपल्याला आयुष्याच्या परीक्षेत कसे पास व्हायचे याचे धडे देतात. आजच्या या दिवशी मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद! जय हिंद!
——————————शिक्षक दिन निबंध लेखन (Essay on Teachers’ Day)हा2>
(हा भाग निबंध शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल)
## प्रस्तावना
मानवी जीवनाचा विकास हा शिक्षणाशिवाय अपूर्ण आहे आणि शिक्षणाचा पाया हा शिक्षकांशिवाय अशक्य आहे. म्हणूनच भारतीय परंपरेत आणि संस्कृतीत शिक्षकांना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा ‘शिक्षक दिन’ हा याच महान परंपरेचा एक भाग आहे.
## इतिहास आणि पार्श्वभूमी
हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे स्वतः एक प्रकांड पंडित, तत्त्वज्ञ आणि थोर शिक्षक होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला होता. त्यांनी शिक्षण क्षेत्राला देशाच्या विकासाचा मुख्य कणा मानले होते. त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात जेव्हा त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्यांनी तो दिवस देशातील सर्व शिक्षकांना समर्पित केला. त्यानुसार १९६२ पासून दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
## शिक्षकांचे समाजातील योगदान
शिक्षक हा समाजाचा मूक शिल्पकार असतो. तो कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, पडद्यामागे राहून देशाची भावी पिढी घडवत असतो. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि प्रगती टिकवून ठेवण्यासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिकांची गरज असते. ही निर्मिती करण्याचे काम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून होते. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, देशभक्ती, परोपकार आणि कष्टाची सवय लावण्याचे काम शिक्षक करतात.
## आधुनिक काळातील आव्हाने आणि शिक्षकांचे महत्त्व
आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. ऑनलाईन शिक्षण, एआय (AI), आणि डिजिटल क्लासरूममुळे शिक्षणाची पद्धत बदलली आहे. परंतु, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी ते शिक्षकाची जागा कधीही घेऊ शकत नाही. कॉम्प्युटर आपल्याला माहिती देऊ शकतो, परंतु कठीण परिस्थितीत धीर देणे, विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे फक्त एक जिवंत शिक्षकच करू शकतो.
## समारोप
शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांना फुलं किंवा भेटवस्तू देण्याचा दिवस नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो, तो देश नेहमी प्रगतीच्या शिखरावर असतो. आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा वापर देशाच्या हितासाठी केला पाहिजे.
——————————भाग ५: शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळ्या (Anchoring Script Lines)
(शाळेत सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या चारोळ्या खूप आवडतात आणि याच्यावर खूप सर्च येतो)
१. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणण्यासाठी:“नमन तया गुरुवर्यांना, ज्यांनी घडविले आम्हा सुजाण,
तुमच्याच मार्गदर्शनाने, वाढेल आमच्या देशाची शान.
आजच्या या मंगल प्रसंगी, करूया गुरु चरणांचे ध्यान,
शिक्षक दिनाच्या या सोहळ्यात, वाढवूया सर्वांचा मान!”२. दीपप्रज्वलनाच्या वेळी:“ज्ञानाचा दीप लावूनिया मनात, अंधार दूर पळवला तुम्ही,
या पवित्र ज्योतीनेच प्रकाशली, आमची ही सुंदर भूमी.
चला करूया दीपप्रज्वलन आत्ता, गुरुरायांच्या साक्षीने,
आजचा हा सोहळा सजवूया, अत्यंत आदराने आणि भक्तीने!”३. शिक्षकांना व्यासपीठावर बोलवताना:“सागर कढेल पण अथांगता सुटणार नाही,
सूर्य मावळेल पण प्रकाश आठवणार नाही.
तसेच आमच्या गुरुंचे उपकार, आम्ही जन्मात विसरणार नाही,
आदरणीय सरांना विनंती करतो, त्यांनी आपले विचार मांडावे इथून जाई…”
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
भाग ५: शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळ्या (Anchoring Script Lines)
(शाळेत सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या चारोळ्या खूप आवडतात आणि याच्यावर खूप सर्च येतो) १. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणण्यासाठी:“नमन तया गुरुवर्यांना, ज्यांनी घडविले आम्हा सुजाण, तुमच्याच मार्गदर्शनाने, वाढेल आमच्या देशाची शान. आजच्या या मंगल प्रसंगी, करूया गुरु चरणांचे ध्यान, शिक्षक दिनाच्या या सोहळ्यात, वाढवूया सर्वांचा मान!”२. दीपप्रज्वलनाच्या वेळी:“ज्ञानाचा दीप लावूनिया मनात, अंधार दूर पळवला तुम्ही, या पवित्र ज्योतीनेच प्रकाशली, आमची ही सुंदर भूमी. चला करूया दीपप्रज्वलन आत्ता, गुरुरायांच्या साक्षीने, आजचा हा सोहळा सजवूया, अत्यंत आदराने आणि भक्तीने!”३. शिक्षकांना व्यासपीठावर बोलवताना:“सागर कढेल पण अथांगता सुटणार नाही, सूर्य मावळेल पण प्रकाश आठवणार नाही. तसेच आमच्या गुरुंचे उपकार, आम्ही जन्मात विसरणार नाही, आदरणीय सरांना विनंती करतो, त्यांनी आपले विचार मांडावे इथून जाई…”
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
